KSRTC Conductor Ranjish Case : केरळमधील इडुक्की जिल्ह्यातील कट्टाप्पना येथून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या चिमुरडीचा एकट्याने सांभाळ करणाऱ्या एका पित्याने, न्यायालयीन लढाईत मुलीचा ताबा गमावल्यानंतर आत्महत्या केली आहे. रंजिश (वय ३८) असे या दुर्दैवी पित्याचे नाव असून, ते केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळात (KSRTC) कुमिली येथे बस वाहक (कंडक्टर) म्हणून कार्यरत होते. मुलीच्या विरहाचे अतीव दुःख सहन न झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असून, या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप आणि न्यायालयात पुरुषांच्या बाजूने होणाऱ्या अन्यायाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
विश्वासघात आणि आठ वर्षांचा एकाकी संघर्ष
मिळालेल्या माहितीनुसार, रंजिश यांनी काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांच्या संसारात एका गोड मुलीचा जन्म झाला. मात्र, लग्न झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच त्यांची पत्नी नोकरीच्या निमित्ताने आखाती देशात (गल्फ) निघून गेली. परदेशात गेल्यानंतर काही काळातच तिने रंजिश आणि आपल्या दोन वर्षांच्या मुलीसोबतचे सर्व संबंध तोडले. तिने तिथे दुसऱ्या एका व्यक्तीसोबत नवीन नाते सुरू केले आणि गेल्या सहा ते आठ वर्षांपासून ती त्याच व्यक्तीसोबत राहत होती.
Here’s the story of Ranjish. 💔
— Revolutionary Monk (@RevolutionMonk) July 17, 2026
He was 38, a bus conductor. He married the girl he loved and had a daughter.
Two years later, his wife left them both and moved to the Gulf. There she found another man, fell in love, and abandoned Ranjish and her daughter.
Ranjish raised his… pic.twitter.com/mom8IpjUDt
या संपूर्ण काळात रंजिश खचून गेले नाहीत. त्यांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या मदतीने अत्यंत प्रेमाने आणि काळजीने आपल्या मुलीचे संगोपन केले. एका सामान्य बस वाहकाची नोकरी करत त्यांनी मुलीला आईची कमतरता भासू दिली नाही.
हेही वाचा – बँक मॅनेजरची मुजोरी! टार्गेट पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना शाखेतच कोंडले; व्हिडिओ व्हायरल
अचानक आलेले वादळ आणि न्यायालयीन लढा
विभक्त झाल्यानंतर तब्बल आठ वर्षांनी रंजिश यांच्या पत्नीने अचानक केरळमध्ये परतत कट्टाप्पना कौटुंबिक न्यायालयात (Family Court) मुलीच्या ताब्यासाठी (Custody Case) याचिका दाखल केली. तिने मुलीला आपल्यासोबत आखाती देशात घेऊन जाण्याची मागणी केली. न्यायालयात झालेल्या कायदेशीर लढाईत, न्यायालयाने आईच्या बाजूने निकाल दिला आणि मुलीला तिच्या आई व सावत्र वडिलांसोबत परदेशात पाठवण्याचा आदेश जारी केला.

ज्या मुलीला स्वतःचे रक्त आटवून लहानाचे मोठे केले, तीच मुलगी आता कायमची दूर जाणार या विचाराने रंजिश पूर्णपणे खचून गेले. कायदेशीर प्रक्रियेत पूर्णपणे हतबल झाल्यानंतर, मुलीची ताटातूट सहन न झाल्याने त्यांनी राहत्या घरी जीवन संपवले.
सोशल मीडियावर तीव्र संताप; पुरुषांच्या हक्कांवर प्रश्नचिन्ह
रंजिश यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. “हा केवळ आत्महत्येचा प्रकार नसून, एका असहाय्य पित्याचा व्यवस्थेने केलेला मानसिक छळ आहे,” अशा भावना युजर्स व्यक्त करत आहेत. अनेक पुरूष हक्क कार्यकर्त्यांनी या घटनेवर तीव्र आक्षेप घेतला आहे. बालकांचा ताबा देताना केवळ आईचा हक्क न पाहता, मुलाचे पालनपोषण कोणी केले आणि मुलाचे मानसिक हित कोणासोबत जोडलेले आहे, याचा विचार न्यायालयाने करायला हवा होता, अशी मागणी आता जोर धरत आहे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा